भारतातील एक शापित गाव जेथे दुमजली घरं बांधायला लोकं घाबरतात, कारण….

फार पूर्वी म्हणजे ७०० वर्षांपूर्वी भेमीया नावाचा युवक त्याच्या पत्नीसह त्या गावात राहत होता. एके दिवशी त्याला गावामध्ये चोरांची एक टोळी आल्याचे त्याला कळाले.


मुंबईमध्ये अनेक मजली इमारती खूप बघायला मिळतात. इमारती २ पासून २५ ते ३० मजल्या पर्यंत आहेत. याला कारण काय तर जागेची टंचाई. मुंबई शहराचे क्षेत्रफळ मर्यादित आहे आणि अशा ठिकाणी जास्तीत जास्त जागा कशी वापरली जाईल यावर भर दिला जातो. त्यामुळे बहुमजली इमारती बांधण्याकडे लोकांचा कल असतो. साहजिकच आहे की अशा ठिकाणी काही पटीने लोकं राहतात. तर दुसरीकडे झोपडीत म्हणजेच कच्या घरांमध्ये राहणारे लोकही बघायला मिळतात. हे चित्र आपल्याला मोठ्या शहरात बघायला मिळते.

त्याच्या उलट छोट्या गावांमधून आपल्याला बैठी घर म्हणजे एक मजली, दोन मजली घरे बघायला मिळतात कारण तेथे मुबलक जमीन असते. आपल्या देशात अशी छोटी छोटी गावे खूप आहेत. प्रत्येकाची मांडणी आणि आकार वेगळी असते आणि ते त्या-त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीवरही अवलंबून असतं. किनारपट्टीवरची घरे उतरत्या छपराची असतात कारण तेथे खूप पाऊस पडतो तर देशावरती जिथे पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी घराचे छत सपाट असते. घराला एकही वरती मजला नाही अशी गावे तर आपल्या भारतात फार दुर्मिळ!

Source : kuikr.com

पण मंडळी आपल्या भारतात असं एक गाव आहे जिथे दुमजली घरे बांधलीच जात नाहीत, तिथे अशी प्रथाच नाही. आहे की नाही काहीतरी जगावेगळं!

गाव म्हणलं की त्या गावाची एक वेगळीच कहाणी असते त्यालाच आपण कथा किंवा दंतकथा म्हणतो. बहुतांश गावांना एक तरी कथा असते. कदाचित आपण त्याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अथवा समज असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण कुठलेही कार्य करायला निघालो आणि त्याच वेळेस एखादे मांजर आडवे गेले तर आपले काम काम होणार नाही असे आपण मानतो.

तर अशीच एक कथा राजस्थान मधील चुरू जिल्ह्यातील उडसर गावाची आहे. असे म्हटले जाते की या गावांमध्ये दुमजली घर बांधले तर त्या कुटुंबावर अनेक आपत्ती व अडचणी येतात, कुटुंबाचा नाशही होतो. फार पूर्वी म्हणजे ७०० वर्षांपूर्वी भेमीया नावाचा युवक त्याच्या पत्नीसह त्या गावात राहत होता. एके दिवशी त्याला गावामध्ये चोरांची एक टोळी आल्याचे त्याला कळाले. ती टोळी गुरेढोरे चोरून घेऊन जात असत. त्या टोळीचा सामना करणे म्हणजे अवघड काम. गावकऱ्यांमध्ये त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Source : shouselaw.com

एके दिवशी ही टोळी चोऱ्यामाऱ्या करत असताना भेमियाने पाहिले व भेमिया या टोळीच्या मागावरती राहिला. चोरांना पळवून लावण्यासाठी त्यांच्याशी तो लढू लागला. सर्वशक्तीनिशी तो चोरांवर तुटून पडला पण त्याच्या एकट्याचा काही निभाव लागू शकला नाही. 

भेमियाला टोळीतल्या लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आता आपला निभाव लागणार नाही असे जेंव्हा भेमियाला वाटले तेव्हा तो तेथून निसटला व जीव वाचवण्यासाठी भेमिया आपल्या सासुरवाडीला घरी गेला. ते घर दुमजली होते व आपण चोरांना सापडू नये म्हणून वरच्या मजल्यावर लपून राहिला.

पण चोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडला व त्याच्यासकट सासरच्या लोकांना मारहाण केली. भेमिया रक्तबंबाळ झाला  व दमून खाली पडला. टोळीतील चोर तेथून निघून जाऊ लागले तेव्हा भेेमिया सर्वशक्तीनिशी उठून त्यांच्यामागे धावत सुटला आणि गावाच्या वेशीपर्यंत आला. चोरांबरोबर लढण्यासाठी त्यांच्यावर सर्व शक्तीनिशी तुटून पडला. शेवटी चोरांनी त्याचा गळा चिरला. भेमिया खाली कोसळला. खाली कोसळत असताना वेशीच्या पलीकडले उडसर गावाच्या हद्दीत भेमिया याचा देह पडला आणि तो गतप्राण झाला.

ही बातमी जेव्हा  भेमियाच्या पत्नीस कळाली तेव्हा ती गावातील लोकांवर चिडली कारण कोणीही त्याच्या मदतीस धावले नाही. पतीच्या मरणाला गावातील लोकच कारणीभूत झाले आहेत अशी तिची धारणा झाली. तिला ते दुःख सहन झाले नाही आणि रागाच्या भरात तिने शाप दिला की जो कोणी स्वतःचे घर दुमजली बांधेल त्याच्या परिवाराचा नाश होईल. भेमियाचे एकट्याने लढण्याचे शौर्य बघून भेमियाचे देऊळ त्या गावच्या लोकांनी बांधलेे.  गावातील लोकांच्या मनात भेमियाच्या पत्नीने दिलेल्या शापाची भीती बसली.

विषाची परीक्षा नको म्हणून त्या दिवसापासून म्हणजे जवळजवळ सातशे वर्षापासून कोणीही दुमजली घर बांधण्याचा प्रयत्न केला नाही.  दुमजली घर बांधले तर संकट ओठावेल असा समज करून घेतला. हाच समज दंतकथा झाली.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *